सोमवार आला की मला माझे लहानपणचे दिवस आठवतात. शाळेत जायचा वैताग आला की मला चक्कर यायची, पोट दुखायचे, आणि बरेच काय काय होत असे.
आज देखिल सोमवारचा दिवस उजाडला की मला लहान मुलासारखे काहीतरी कारण सांगुन घरी बसावेसे वाटते. सोमवारी कामावर जायचे अगदी नकोसे वाटते. मात्र एकदा कामावर गेल्यावर सगळा आळस पळून जातो हे ही तितके खरेच.
आज प्रत्येकजण शिक्षणाचे महत्त्व सांगू लागला आहे. मराठी माध्यमातून शिकणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण वाटू लागले आहे. इंग्लिश माध्यम देखिल कमी म्हनून की काय आता इंटरनॅशनल अभ्यासक्रम शिकणे कसे आवश्यक आहे ह्यावर चर्चा झडत आहेत.
पण खरे सांगू दोस्तांनो ! ह्या स्पर्धेत बालकांचे बालपण हरवले आहे. चकाचक फॅशनच्या दुनियेत मनाचा निरागासपणा हरवत चालला आहे. भविष्याची तरतूद करताना वर्तमानकाळ नाहीसा होत चालला आहे.
खरे सांगू मित्रांनो ! मला आता ह्या क्षणी शाळेतले मुल व्हावेसे वाटत आहे. माझ्या लहानपणी मूल कमीतकमी ५ वर्षांचे होत नाही तोपर्यंत शाळेत जात नसे.
आता तर मूल एक वर्षाचे झाले रे झाले की त्याच्यामागे प्लेग्रुप, नर्सरी मोन्टेसरी इत्यादि इत्यादि झंझट चालु होते. आमची पीढी खुपच नशीबवान आहे की ज्याना आपले बालपण व्यवस्थित उपभोगता आले. “बालपणीचा काळ सुखाचा” हेच खरे !
अगदि खरे आहे.ब-याचदा या भावना मनात येतात.”आमची पीढी खुपच नशीबवान आहे की ज्याना आपले बालपण व्यवस्थित उपभोगता आले. “
By: Shailaja on 16/08/2010
at 2:10 pm
धन्यवाद !
By: rajdharma on 28/08/2010
at 11:28 सकाळी
सहमत
By: अनिकेत on 16/08/2010
at 8:29 सकाळी
धन्यवाद साहेब !
By: rajdharma on 28/08/2010
at 11:28 सकाळी